बुधवार, ९ मे, २०१८

कधीतरी

कधीतरी अचानक अस्वस्थ वाटायला लागतं काहीही नसतांना…
कुठले कुठले विचार मनात उगाचंच फेऱ्या घालत असतात…
काही मागचे विचार तर काही येणाऱ्या आयुष्यातील घडामोडींबद्दल भीती…
काहीशी भीती आपण टाकत असलेल्या नवीन पाउलाबद्दल,
तर काही विचार कुणालातरी दुःखात पाहूनही येतात…
कधीतरी आपल्या एकदम सुरळीत चाललेल्या जीवनाबद्दलही एक प्रकारची चीड यायला
लागते
कुठल्याच गोष्टींनी मग हे मन नावाचं पप्रकरण शांत होत नाही…
कुठल्याश्या आपल्या चुका, स्वतःवरच उलटलेले आपले काही ठामपणे घेतलेले निर्णय,
कुणाचेतरी अगदी आपल्याही नकळत दुखावलेले मन
आणि कुणीतरी मोठ्याने रागावलेले क्षण…
गुंताच गुंता होतो विचारांचा…
कुठेले कुठले विसंगत विचार एकाच वेळी आपल डोक उठवत असतात...
त्याच वेळी आपण कुणाला परत नकळत दुखावतो...
आणि अगदी त्याच वेळी, पुढच्या वेळेच्या आपल्या विचारांना नकळतच खाद्य मिळालेल
असतं…

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरस्वती पूजन

 आम्ही लहान असतांना शाळेत सरस्वती पूजन असा एक कार्यक्रम असायचा. प्रत्येक वर्गाने तो आपापला वेगळा साजरा करायचा (किंवा कुणी मिळूनही साजरा कराय...