समुद्र..
तळाशी शांत आणि वरून खवळलेला समुद्र, लाटांच्या तालावर लहरणारा समुद्र, अथांग आणि त्या बरोबरच सुंदर समुद्र...
पोटात दडवलेला खजिना अगदी शांत. वाऱ्याच्या प्रवाहाने लाट येऊन वरचे पापुद्रे तेवढे एक एक काढत जाते. वरवर वाऱ्याला तो कितीही मुभा देत असला तरीही आतलं अस्तित्व हलवू देत नाही, समुद्र आत थांगपत्ता न लागू देता वरचेवर त्याच्याशी लढत असतो...
त्याच्या पुढ्यात जाताच स्वच्छ आणि कोऱ्या पाटीसारखं मन होऊन जातं. आयुष्यातल्या घडामोडी किती छोट्या आणि हा असा थेट समोर उभा असलेला समुद्र कित्ती मोठ्ठा असं वाटतं... सर्वत्र पाणी, किनारा काय ते माहिती नसणारं... चित्रकार पानांवर मनसोक्त रंग उधळून देतो आणि तो सर्वत्र पसरतो तसं चोहोबाजूंनी पसरलेलं पाणी... सूर्योदय आणि सूर्यास्ताला रंगांचा आणि प्रकाशाचा उत्सवच...
अस्तित्व असावं तर समुद्र सारखं.. क्षणा-क्षणाला जाणीव करून देणारं, बाहेरील वादळं कितीही उध्वस्त करणारी असली तरीही स्वतःच्या आतल्या मनाला धक्काही न लागू देणारं..
आपण काही काळ स्वतःला विसरून बघत असतो त्याचा थाट, त्याचं ओरडणं, शांत होणं, किरणांनी चकाकणं आणि त्याचं बेधुंद होणं...
बेभान वाहणाऱ्या वाऱ्याला अंगावर झेलत, त्याच्या आवाजाने शांततेत मिसळलेला विशिष्ट आवाज ऐकत आणि त्याच्या फेसाळणाऱ्या लाटांचा पायांना स्पर्श होताच आनंदून जाणारं मन आणि पाऊलं घेऊन आपण परत फिरतो...
परतीच्या वेळी पुन्हा एकदा त्याला वळून त्याचं विशाल अस्तित्व आणि मनात दाटलेली शांतता फक्त सोबत असते...
तळाशी शांत आणि वरून खवळलेला समुद्र, लाटांच्या तालावर लहरणारा समुद्र, अथांग आणि त्या बरोबरच सुंदर समुद्र...
पोटात दडवलेला खजिना अगदी शांत. वाऱ्याच्या प्रवाहाने लाट येऊन वरचे पापुद्रे तेवढे एक एक काढत जाते. वरवर वाऱ्याला तो कितीही मुभा देत असला तरीही आतलं अस्तित्व हलवू देत नाही, समुद्र आत थांगपत्ता न लागू देता वरचेवर त्याच्याशी लढत असतो...
त्याच्या पुढ्यात जाताच स्वच्छ आणि कोऱ्या पाटीसारखं मन होऊन जातं. आयुष्यातल्या घडामोडी किती छोट्या आणि हा असा थेट समोर उभा असलेला समुद्र कित्ती मोठ्ठा असं वाटतं... सर्वत्र पाणी, किनारा काय ते माहिती नसणारं... चित्रकार पानांवर मनसोक्त रंग उधळून देतो आणि तो सर्वत्र पसरतो तसं चोहोबाजूंनी पसरलेलं पाणी... सूर्योदय आणि सूर्यास्ताला रंगांचा आणि प्रकाशाचा उत्सवच...
अस्तित्व असावं तर समुद्र सारखं.. क्षणा-क्षणाला जाणीव करून देणारं, बाहेरील वादळं कितीही उध्वस्त करणारी असली तरीही स्वतःच्या आतल्या मनाला धक्काही न लागू देणारं..
आपण काही काळ स्वतःला विसरून बघत असतो त्याचा थाट, त्याचं ओरडणं, शांत होणं, किरणांनी चकाकणं आणि त्याचं बेधुंद होणं...
बेभान वाहणाऱ्या वाऱ्याला अंगावर झेलत, त्याच्या आवाजाने शांततेत मिसळलेला विशिष्ट आवाज ऐकत आणि त्याच्या फेसाळणाऱ्या लाटांचा पायांना स्पर्श होताच आनंदून जाणारं मन आणि पाऊलं घेऊन आपण परत फिरतो...
परतीच्या वेळी पुन्हा एकदा त्याला वळून त्याचं विशाल अस्तित्व आणि मनात दाटलेली शांतता फक्त सोबत असते...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा