सोमवार, ३० मार्च, २०१५

शेवट...

प्रत्येक गोष्टीला शेवट हा असतोच आणि तो कधी ना कधी येणारच हे निश्चीत... शेवटाशिवाय मजाही नाही कुठल्या गोष्टीला... अमर असणं किंवा होणं हे जरी खूप छान वा हँपनिंग वाटत असलं तरी त्यात काही रस नाही जगण्याचा...

कधीतरी आपलाही शेवट होणारच ह्या भितीपोटी म्हणा किंवा सत्याला स्विकारून म्हणा प्रत्येकजण येणाऱ्या क्षणाला जगण्यासाठी धडपडतो. त्यातच तर खरी मजा आहे... कुठल्या क्षणी शेवट आपल्या डोळ्यांसमोर येऊन उभा राहील सांगता येत नाही म्हणून क्षणांच सोनं करण्याचा हा प्रवास...

तसंच या क्षणभंगूर गोष्टी आणि घटनांचही...
शेवटाला धरुनच नविन सुरुवात होते पुढल्या पायरीची..
ती पायरी चढणं सुरवातीला अवघड वाटतं, पाउल उचलायला त्रास होतो पण नव्याचा प्रभाव आणि जुन्याच्या आठवणी ताण हलका करतात..
खरंतर कित्येक शेवटाला सामोरे जात इथवर आलोय आपण... असंख्य घटनांचे, मैत्रींचे, नात्यांचे, माणसांचे, जागांचे शेवट आपण जगलोय आणि जगून उरलोय पण तरीही नव्या शेवटाला मन घाबरतं, खजील होतं, आतून पार तोडून टाकतं, आणि आठवणींसोबत जगायला शिकवतं...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरस्वती पूजन

 आम्ही लहान असतांना शाळेत सरस्वती पूजन असा एक कार्यक्रम असायचा. प्रत्येक वर्गाने तो आपापला वेगळा साजरा करायचा (किंवा कुणी मिळूनही साजरा कराय...