सिंधी मुलगी मारवाडी मुलगा,
मराठी मुलगा सिंधी मुलगी,
मुस्लिम मुलगा पंजाबी मुलगी,
पंजाबी (मुळचा मराठी ) मुलगा पंजाबी मुलगी,
बंगाली मुलगा पंजाबी मुलगी,
etc etc…
एकमेकांवर मनापासून प्रेम करणाऱ्या ह्या कॉलेज मधल्या काही जोड्या…
त्यांना एकत्र बघूनच समोरच्याच मन खुश व्ह्यायचं इतक्या मस्त आणि खुशाल जोड्या…
खूप सारे क्षण, दिवस, महिने, दोन वर्ष एकत्र जगलेत त्यांनी…
बऱ्या वाईट दिवसांना एकमेकांची सोबत केली, आनंदाचे सोहळे एकत्र पार पाडले.
खूप जगले भरभरून…
पण टांगती तलवार डोक्यावर घेऊनच.
ती तलवार होती भीतीची, घरचे आपल्या नात्याला मान्य करणार की नाही? आपलं भविष्य सोबत असणार की नाही?
हे सारे प्रश्न च प्रश्न पण तरीही त्यांनी आपला वर्तमान काळ पुरेपूर जगून घेतला
कारण खूप आवडणारी कुणी व्यक्ती आपल्या आयुष्यात यावी यालाही भाग्य लागतं आणि प्रेम हे परत परत होत नसतं हे त्यांच मत
ज्या व्यक्तीने आयुष्यभर आपली साथ द्यावी आणि आपल्या सोबत सात जन्म असावं असं वाटतं त्यांना निरोप देणे हे किती कठीण होत असेल?
पण त्यांनी निरोप दिला एकमेकांना…
कारण? घरच्यांचा विरोध, भांडणं, समाज मध्ये येत गेलं…
त्यांच्या लेखी ह्या सगळ्यांची गिणती नव्हतीच कधी, पण घरच्या लोकांच्या प्रतिष्ठेला धक्का लावण्याची इच्छाही नव्हती कदाचित…
आपल्या मुळे पालकांना कुणी बोट दाखवू नये, त्यांना अपमान सहन करावा लागू नये आणि त्यांच्या दुखःला कारण मिळू नये म्हणूनही कदाचित…
काय होत नेमकं त्यांच्या मनात हे त्यांनाच ठाऊक, ते वेगळे झाले.
त्यांचे सोनेरी स्वप्न एव्हाना धुसर झालेत…
आताही आठवतात त्यांचे वेगळे होतानाचे उदास चेहेरे, कॉलेज संपल्यावर आता पुन्हा कधीच अशी सोबत नसणार हे कळून चुकलेले चेहेरे,
एकमेकांसोबत फोटो काढत, वेगवेगळे हावभाव करत फोटो चा आनंद घेत, त्या आनंदात दुःखाची झालर स्पष्ट दिसून येत होती,
कसा असेल भविष्यकाळ कुणा दुसर्यासोबत? ते कल्पनाही नाही करू शकणार…
काही महिने उलटून गेलेत ह्या गोष्टीला…
आता बातम्या मिळत असतात कुणाच लग्न झालं, कुणी engage झालं, तर कुणाच्या लग्नाची गोष्ट सुरुये त्यांच्या घरात
आणि त्या तुटलेल्या जोड्यांपैकी सगळेच आता नवीन वाटेवर चालायला सज्ज झालेत
डोळ्यांत अश्रू घेऊनच पण धडपडताहेत त्या आठवणींसोबत जगण्यास किंवा त्यापासून दूर जाण्यासाठी…
ते कधीही विसरू शकणार नाहीत त्या सोबत जगलेल्या क्षणांना…
त्यातल्याच एकीसोबत बोलले काही दिवसांपूर्वी, ती म्हणाली मी उध्वस्त झालीये ह्या सगळ्याने, कशातच लक्ष लागत नाही, सारखा त्याचा चेहेरा डोळ्यांसमोर येतो, तिच्या घरी हा विषयही निघाला तरी तिचे पालक कुठल्या टोकाला जातील ह्याची भीती तिला काही करूच देत नाही, त्याच्या ही घरी अशीच काहीशी स्थिती… हे झालं एक उदाहरण, कमी अधिक फरकाने अशीच स्थिती बाकीच्यांचीही…
हेच मनाला समजावून ते सावरताहेत स्वःताला…
त्यांना नेहमी आठवेल ती जिवलग व्यक्ती एक आठवण म्हणून, अनमोल ठेवा म्हणून आणि आयुष्यातला एक धडा म्हणूनही आठवेल…