काहीतरी शोधत असतात माणसं, सारखं अवती भवती...
त्यांना काहीतरी हवंच असतं, खूप वेगळ आणि खूप नवं…
पण काय हवयं नेमकं तेच कळत नाही…
काहीतरी असावं ना जवळ जे फक्त आपलच असावं…
फक्त आपलं ज्यात कुणाचाच वाटा नसावा…
मग धावतात ती पुढ पुढ… अंधारात
(किंवा उजेड जाणणारे असेल तर तेही)
काहीतरी लागतही त्यांच्या हातात पण कधीच तृप्त नाही करत त्यांच्या अपेक्षा…
काय हवंय मला???
पैसा, घर, प्रेम, प्रसिद्धी, हक्क, न्याय, वर्चस्व, कि समाजात मानाच स्थान???
याचाच विचार करता करता हरायलाही लागतात…
याउलट काही माणसं असतात,
जे हवंय तेच मिळवण्याची जिद्द असते त्यांच्यात…
हर एक दिशा साद देत असते त्यांना पण…
ते जातात तिथेच जिथे त्यांचा हट्ट असतो…
भांडतात, पडतात, चढतात, हरतात, पुन्हा चढतात…
अशी जगण्याची लढाई सुरु असतानाच ते मिळवतात त्यांच्या हक्काची गोष्ट
आणि समाज मग त्यांना नाव देतो आणि मानाचं स्थानही …
आजही ऐकलय असंच काहीतरी…
आणि कळल कि आपली विचारांची क्षमता जिथे संपते तिथूनच त्यांच्या जगण्याची सुरवात होते…
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा