सध्यातरी आपल्याला एकच प्रश्नचिन्ह सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसतं, "काय होणार ह्या देशाचं? "
देश बदललाय, मागे पडत चाललाय, आधी काय होतो आपण आणि आता काय स्तिथी झालीये??
राजकारण्यांनी देशाचं वाटोळ केलंय, इंग्रजांनी लुटलंय आणि काय काय…
पण आपण कधी हा विचार केलाय का कि मी बदलू शकते/तो ह्या देशाला, मी काही अंशी का होईना सुधार घडवून आणेल...
आपण लहानपणापासून शिकत आलोय (किंवा सभोवतालच वातावरण आणि लोकांची वृत्ती बघून शिकलोय) की करणारा करेल, मी का पुढे जाऊ ऊगाच, भीती वाटत असते आपल्याला पुढे जाण्याची नाही तर संकट झेलण्याची
इथेच अडतो ना आपण… आणि बघत बसतो डोळ्यांसमोर चाललेला खेळ...
कधी कधी होते आपलीही चिडचिड, अस्वस्थ होतो आणि आवाज चढवतोही वर…
अण्णांसारखा कोणी उपोषणाला बसला बसला एखादा की पूर्णपणे सहभाग असल्याचं दर्शवतो…
जे काही असेल आपल्या हातात ते सगळ काही करतो (मनापासून) पण परत पहिले पाढे पंचावन्न...
आपला नेता शांत झाला किंवा थकला की आपणही थकतो आणि लागतो आपल्या आपल्या रोजच्या वळणावर चालायला
काही खरं नाहीये आता ह्या देशाचं- पुन्हा हेच उद्गार निघत राहतात…
पण आपण अजूनही समृद्ध आहोत, आपला देश जागा आहे, पुढे जातोय (अवघडत का होईना पण जातोय)…
कधी विचार केलाय का की कोण आहे ह्या मागे?
आपण आशा आकांक्षा अजूनही जाग्या आहेत कारण…
कारण काही लोक आहेत जागे… झगडताहेत, लढतायेत देशासाठी…
आपण झोपलेलो आहोत आळसावत, पण ते लढतायेत
त्यांना विश्वास आहे की आपल गेलेलं वैभव परत येणार, आपला देश समृध्द होणार
मी आणेन ते परत…
कुठून येत असेल हा विश्वास?
सगळ आयुष्य झोकून दिलं तरीही खूप काही करण्याचं बाकी राहणारच हे त्यांनाही कळतंय, पण ते लढतायेत…
अश्याच एका व्यक्तिमत्वाचे विचार जवळून ऐकता आले, "नितीन परब" त्याचं नाव…
कमालीच वक्तृत्व, नैतृत्व आणि कमालीची उर्जा, बोलणं एकदम स्पष्ट आणि ठळक
विचारातला कणखरपणा आणि ताकद कळत जाते ऐकतांना…
त्यांना विश्वास आहे कि आपला देश परत होणार समृद्ध
इथल्या प्रत्येक रिवाज आणि अध्यात्माबद्दल अभ्यास आणि सर्व बाजूंनी देशाचा आढावा…
त्यांना बघून वाटला विश्वास की बदलणार देश, आणि आपणही तो नेऊ शकतो पुढे…
सगळ्यांनी आपापला वाट उचलला की कठीण काहीच नाही…
अश्याच काही व्यक्तींमुळे जे खरच झटतात देशासाठी, इथल्या लोकांसाठी, आपल्यासाठी, म्हणुनच आपण आज ताठ मानेने उभे आहोत...
ते लोक कुणीही असू शकतात, कुठला नेता, सीमेवरचे जवान, कुठलेसे संशोधक किंवा आगदी सामान्य माणूस...
ते आहेत म्हणूनच आपण आहोत आणि त्यांच्या असण्यानी फरक पडतोय आपल्याला…
देश बदललाय, मागे पडत चाललाय, आधी काय होतो आपण आणि आता काय स्तिथी झालीये??
राजकारण्यांनी देशाचं वाटोळ केलंय, इंग्रजांनी लुटलंय आणि काय काय…
पण आपण कधी हा विचार केलाय का कि मी बदलू शकते/तो ह्या देशाला, मी काही अंशी का होईना सुधार घडवून आणेल...
आपण लहानपणापासून शिकत आलोय (किंवा सभोवतालच वातावरण आणि लोकांची वृत्ती बघून शिकलोय) की करणारा करेल, मी का पुढे जाऊ ऊगाच, भीती वाटत असते आपल्याला पुढे जाण्याची नाही तर संकट झेलण्याची
इथेच अडतो ना आपण… आणि बघत बसतो डोळ्यांसमोर चाललेला खेळ...
कधी कधी होते आपलीही चिडचिड, अस्वस्थ होतो आणि आवाज चढवतोही वर…
अण्णांसारखा कोणी उपोषणाला बसला बसला एखादा की पूर्णपणे सहभाग असल्याचं दर्शवतो…
जे काही असेल आपल्या हातात ते सगळ काही करतो (मनापासून) पण परत पहिले पाढे पंचावन्न...
आपला नेता शांत झाला किंवा थकला की आपणही थकतो आणि लागतो आपल्या आपल्या रोजच्या वळणावर चालायला
काही खरं नाहीये आता ह्या देशाचं- पुन्हा हेच उद्गार निघत राहतात…
पण आपण अजूनही समृद्ध आहोत, आपला देश जागा आहे, पुढे जातोय (अवघडत का होईना पण जातोय)…
कधी विचार केलाय का की कोण आहे ह्या मागे?
आपण आशा आकांक्षा अजूनही जाग्या आहेत कारण…
कारण काही लोक आहेत जागे… झगडताहेत, लढतायेत देशासाठी…
आपण झोपलेलो आहोत आळसावत, पण ते लढतायेत
त्यांना विश्वास आहे की आपल गेलेलं वैभव परत येणार, आपला देश समृध्द होणार
मी आणेन ते परत…
कुठून येत असेल हा विश्वास?
सगळ आयुष्य झोकून दिलं तरीही खूप काही करण्याचं बाकी राहणारच हे त्यांनाही कळतंय, पण ते लढतायेत…
अश्याच एका व्यक्तिमत्वाचे विचार जवळून ऐकता आले, "नितीन परब" त्याचं नाव…
कमालीच वक्तृत्व, नैतृत्व आणि कमालीची उर्जा, बोलणं एकदम स्पष्ट आणि ठळक
विचारातला कणखरपणा आणि ताकद कळत जाते ऐकतांना…
त्यांना विश्वास आहे कि आपला देश परत होणार समृद्ध
इथल्या प्रत्येक रिवाज आणि अध्यात्माबद्दल अभ्यास आणि सर्व बाजूंनी देशाचा आढावा…
त्यांना बघून वाटला विश्वास की बदलणार देश, आणि आपणही तो नेऊ शकतो पुढे…
सगळ्यांनी आपापला वाट उचलला की कठीण काहीच नाही…
अश्याच काही व्यक्तींमुळे जे खरच झटतात देशासाठी, इथल्या लोकांसाठी, आपल्यासाठी, म्हणुनच आपण आज ताठ मानेने उभे आहोत...
ते लोक कुणीही असू शकतात, कुठला नेता, सीमेवरचे जवान, कुठलेसे संशोधक किंवा आगदी सामान्य माणूस...
ते आहेत म्हणूनच आपण आहोत आणि त्यांच्या असण्यानी फरक पडतोय आपल्याला…
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा