शनिवार, १६ फेब्रुवारी, २०१९

प्रेम...

प्रत्येकाच्या आयुष्यात एक अपुरं, अधुरं राहिलेलं प्रेम असावं.. एकतर्फी किंवा दोन्ही बाजूंनी असणारं प्रेम, एखादी खूप आवडणारी व्यक्ती असं कुणीही... कधी कधी उगाच त्यांची आठवण यावी, सगळं जग बहरून यावं, आठवणींनी गर्दी करावी, पहिल्या पावसात हमखास आठवण यावी आणि प्रेमाच्या संभाषणात न चुकता हजेरी लावावी तर कधी सिनेमाच्या कथानकात भेटावं...  
प्रेम जोडीदारावर तर नक्कीच असावं आणि ते ही परिपुर्ण.. पण कधीतरी भूतकाळात घेऊन जाणारी एक गुलाबी तार जरूर असावी ज्या तारेला छेडल्यावर मधुर सूर ऐकू येतील.. 
त्यांच्या सोबत संवाद असणं जरुरी नाहीच.. फक्त एक आठवण असावी.. भर दुपारी पापण्या मिटल्यावर थंडावा देणारी एक तरी कहाणी असावी... 
आठवण आल्यावर हृदयाचे ठोके वाढावे अगदी तसेच जसे त्यांना पाहिल्यावर कधी वाढलेले, श्वास थोडा गतिमान व्हावा.. कधी अचानक भेटल्यावर एखादा ठोका चुकावा.. आधीचे दिवस आठवत त्यात रमावं.. प्रवासात खिडकीतून बाहेर बघत रम्य स्वप्न पाहिलेली आठवावी.. 
आणि मनसोक्त आठवून झाल्यावर परत ताजं टवटवीत मन घेऊन भूतकाळ परत जगायला घ्यावा.. 
अधुरं प्रेम वेदनाच देतं असं नाही तर नीट विचार केला की कळतं एक सुखद आठवणींच जाळं तयार झालंय.. 

सरस्वती पूजन

 आम्ही लहान असतांना शाळेत सरस्वती पूजन असा एक कार्यक्रम असायचा. प्रत्येक वर्गाने तो आपापला वेगळा साजरा करायचा (किंवा कुणी मिळूनही साजरा कराय...